कर्तारपूर कॉरिडॉर :- कोणाला काय मिळाले.



कर्तारपूर कॉरिडॉर :- कोणाला काय मिळाले.

मा. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय बाजूच्या कर्तारपूर कॉर्रिडोरचे भूमिपूजन, दि. २६ नोव्हेंबरला 'गुरुदासपूर' येथे संपन्न झाले. या रस्त्यामुळे भारतातील शीख समुदाय पाकिस्तानातील कर्तारपूर येथील सर्वात महत्वाच्या अश्या गुरुद्वाराचे दर्शन घेऊ शकणार आहे. येथे गुरु गोविंदसाहेब आपल्या आयुष्यातील अठरा वर्षे राहिले होते. इथे राहूनच त्यांनी शीख समुदायाला एकत्र आणण्याचे महत्वाचे कार्य केले. १५३९ साली त्यांचा मृत्यूही याच पवित्र भूमीवर झाला. पुढच्या वर्षी श्री गुरु नानकदेव यांचा ५५० वा जन्मोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे.

हा प्रवास पाकिस्तानच्या हद्दीत असला तरी यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची गरज भाविकांना असणार नाही. केवळ एक परमिट मिळवून भक्त दर्शनाला जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात आहे. हा 'एक दिशा मार्ग (one way corridor)' असणार आहे. गुरुद्वारात जाणे, दर्शन घेऊन, धार्मिक विधी आटोपून आल्या पावली परत येणे, अशी त्याची आखणी आहे. म्हणजेच परमिट नसणारा कोणीही भारताच्या हद्दीत प्रवेश करू शकणार नाही. आणि भारतीय भाविकही गुरुद्वारा सोडून इतर कुठेही जाऊ शकणार नाहीत.

याचा सर्वात मोठा फायदा भारतातील शीख बंधूंना होणार आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्या कर्तारपूर येथील गुरुद्वारा आता भारतीय सिख लोकांसाठी खुले झाले आहे. गेली सत्तर वर्षे ते कर्तारपूर पासून ४ किमी वर असणाऱ्या गुरुद्वारात जाऊन आपली दर्शनाची आस भागवत असत. भारतीय हद्दीत असणाऱ्या डेरा बाग्रा या स्थानावर दुर्बिणी लावलेल्या आहेत. केवळ भारतीय असल्यामुळे आजपर्यंत या शीख,जाट लोकांना आपल्या गुरूंचे दर्शन दुर्बिणीतून घ्यावे लागत असे. त्यामुळे अश्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कर्तारपूर कॉरिडॉर बनवावा, अशी मागणी सर्वप्रथम पूर्व प्रधानमंत्री श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनीच त्यांच्या लाहोरच्या सद्भावना यात्रेच्या वेळी केली होती. आज मग्रूर, हरामखोर पाकिस्तानची अशी अवस्था झाली आहे, कि एक डिप्लोमॅटिक खेळी म्हणून का होईना त्यांना हे मंदिर भारतीय साधकांसाठी खुले करणे भाग पडले आहे. आता याला Referendum २०२० चीही एक किनार आहे.

अतिशय मैत्रीपूर्ण, प्रेमळ, सज्जन, निर्मळ, शांतीप्रिय अशी एकमेकांची प्रतिमा उभी करण्याचा काँग्रेसी नवज्योत सिद्धू आणि पाक पंतप्रधान इमरान खान जीव तोडून प्रयत्न करत आहेत. आता यात इमरान खान हे पाक मिलिटरीच्या हातातली बोलकी बाहुली किंवा पाकिस्तानी पप्पू म्हणून ओळखले जातात. आणि सिद्धू च्या बाबत काल-परवाच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अश्याच प्रकारचे विधान केले आहे. (या कॉंग्रेसी नेत्याने या प्रकरणात घेतलेली भूमिका अभिमानास्पद आहे.) म्हणजे उंदराला मांजर साक्षी म्हणतात त्यातला प्रकार आहे. परंतु तरीही आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानने भारताकडे टाकलेले

मैत्रीपूर्ण पाऊल अशी या घटनेची नोंद करण्याचा पुरेप्पूर प्रयत्न केला जात आहे. आणि त्यावेळी,

१. आजपर्यंत ७० वर्षांत हे काम का होऊ दिले नाही?

२. आज असा पवित्रा घेऊन पाकला काय साधायचे आहे?

३. दिवाळखोर अवस्थेत स्वनिर्मित शत्रुत्व सांभाळणे अशक्य होऊ लागले आहे काय?

४. Referendum २०२० शी याचा काय संबंध आहे? कारण प्रो-खलिस्तानी बिलबोर्डस पाकिस्तानात जागोजागी दिसत आहेत.

५. सीमेवर सातत्याने होणारी killings का थांबवली जात नाहीत? हाफिज सईदचा उजवा हात गोपालसिंग चावला या सोहोळ्यात उजळ माथ्याने कसा मिरवू शकतो? असले सगळे प्रकार करून पाकिस्तान भारताचा अपमान करत आहे ना कि भारतीयांसाठी काही सत्कृत्य..

६. जवळपास निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यामागे विविध प्रकारची तस्करी, हवाला, घुसखोरी यातलं तर काही शिजत नाही ना?

७. एकीकडे गिलगिट बाल्टिस्तान हा सध्या पाकव्याप्त असलेला भारताचा अविभाज्य भाग पाकिस्तानी प्रांत असल्याचं विधेयक मांडण्याची तयारी करायची आणि दुसरीकडे साळसूदपणे मैत्रीचे ढोंग रचायचे हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगासमोर मांडायला हवा.

८. बलाची नेत्यांना फुटीरतावादी चळवळीसाठी भारत मदत करतो असा, आरोप पाकिस्तान सतत करत असतो. तुमच्याकडे बलुचिस्तान तर आम्ही ISI च्या मदतीने खलिस्तानची चळवळ पेटवू अशी पाकिस्तानची भूमिका या त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होते आहे.

असे प्रश्न आणि मुद्दे भारतीय मुत्सद्दीनी जागतिक मंचावर उपस्थित करणे आवश्यक आहे.

खरेतर मोदीजींची परराष्ट्रनीती पाकला नाचवत आहे. पण आम्हाला नृत्य आवडतेच मुळी, म्हणून आम्ही नाचतो आहोत; असा आव आणण्याचा पाकचा ढोंगी प्रयत्न अगदीच उघडा पडतो आहे.पाकिस्तानी सत्तेला मोदी २०१९ साली परत सत्तेवर आले तर जगणे मुश्किल होईल हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. बलुचिस्तान, पश्तुन, सिंध प्रांतात फुटीरतावादाची सुरुवात झालीच आहे. मोदींच्या रणनीतींमुळे पाकिस्तान स्वतःचे जगभरातील मॉरल स्टँडिंगही गमावत आहे. हटकून मागे उभे राहणारे अमेरिका, रशिया हात झटकून टाकत आहेत. तीव्र स्वरूपाच्या आर्थिक विवंचना आहेत. चीन म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, असं खुंखार जानवर आहे. एकंदरीत परिस्थिती गंभीर आहे.

आता यावर तोडगा म्हणून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने खान साहेबांनी भारतीय काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे.( हे वेळोवेळी लक्षात येते आहे.) आणि सिद्धूसाठी जोरदार batting करण्यात ते धन्यता मानत आहेत. सिद्धूपाजीही काही कमी नाहीत. पाकिस्तानात होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या आपल्या भाषणात तर त्यांनी खांसाहेबांना केवळ लोटांगण घालण्याचे बाकी ठेवले होते. तसेच गुप्त बैठकीत खलिस्तानी आतंकवादी आणि हाफिज सईदचा महत्वाचा साथीदार गोपालसिंग चावला याच्याबरोबर सिद्धूचे फोटोस पुराव्यांच्या रूपात पुढे येत आहेत. भाताईंचे एकात्मतेच्या आणि शांततेच्या दृष्टीने हि खळबळजनक माहिती आहे. नवज्योत सिद्दू याना पदच्युत करण्यात यावे अशी मागणीही जोर धरत आहे.

या सगळ्या लांडग्या कोल्ह्यांच्या भाऊगर्दीत आज एक चेहरा भारतीय अस्मितेची चमक दाखवून गेला. मा. सुषमाजींच्या वतीने पंजाब राज्यातील केंद्रात मंत्री असणाऱ्या 'हरसिमरत कौर बादल' यांनीही या कार्यक्रमात भाषण दिले. गुरु गोविंदसिंगांचे विचार, सिख तत्वज्ञान, भारतीयांच्या भावना, भारत सरकारची या विषयातली भूमिका, अश्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या भाषणातून अतिशय समर्थपणे मांडल्या. आज त्यांच्याविषयीचा आदर वाढला.

सजग नेतृत्व, भारतीय समाजाप्रती असणारी केंद्रातील सत्तेची सहभावना, भारतीयांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याची तळमळ अश्या अनेक गोष्टींचा कर्तारपूर कॉरिडॉर हा परिपाक आहे. भाजप सरकारच्या शिरपेचातला हा मानाचा तुरा आहे.

#अमिता

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट